कधी फिराल या वारीत तर दिसेल अखंड मराठी गाव;
रूप, रंग, बोली जरी वेगळी तरी सर्वांमुखी त्या माऊलीचेच नाव.
निरखून ऐकाल या जनांचे कीर्तन, तर ऐकू येतील बहू आवर्तन;
काहींच्या गोष्टी भिडते अतरंगी, तर काहींच्या नुसत्याच सांगोपांगी.
कोणाच्या गोष्टीमध्ये आहे मायेची विचारपूस; तर कोणाच्या मनामध्ये आहे फक्त धुसफूस.
कोणी विचारत आहे, होईल का माझे लेकरू यंदा तरी पास?;
तर कोणाच्या नेत्री आहे पावसाची आस.
कोणी आले आहे सोबत आपल्या नातवंडांना घेऊन;
तर कोणी आले आहे आपल्या मालकाचे मढे नुकतेच पोहोचवून.
कोणी मागत आहे सुख,शांती आणि समाधान;
तर कोणी आळवत आहे मोक्ष, मुक्ती, वैकुंठाचे दान.
सर्वांच्या वदनी आहे माऊली हेच नाव;
पण प्रत्येकाच्या नयनात आहे एकच भाव, माऊली आता तरी पाव, आता तरी पाव.
No comments:
Post a Comment